Marathi Serial : झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Ahe) ही मालिका बरीच चर्चेत आहे. प्रेक्षकांना या मालिकेचं कथानक काही केल्या पसंतीस उतरत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या मालिकेला बरंच ट्रोल केलं जातं. पण ही मालिका सध्या बरीच रंजक वळण घेत आहे. आकाशची आई ही वसुंधराला नातू हवा असं म्हणते. त्यामुळे आधीच कसोटीच्या उंबऱ्यावर असलेल्या आकाश आणि वसूच्या नात्याला एक वळण मिळतं. 


त्यातच आता आकाश वसूला गुंडापासून वाचवतो, त्यामुळे आकाशचं एक नवं रुप वसूसमोर येतं. त्यामुळे आता यांचं नातं कोणतं नवं वळण घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे आकाशच्या आईने वसूच्या आईवडिलांना त्यांचं घर बनीच्या नावावर करायला सांगितलेलं असतं, हे सत्य देखील आकाश आणि वसुंधरासमोर येणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 


वसूला दिसणार आकाशचं वेगळं रुप


'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसूच्या आग्रहाखातर आकाश सुशीला आणि सुधीरसोबत (वसूच्या आई बाबांबरोबर) डिनरला गेले असताना आकाशाला वसूच्या संगीताच्या कौशल्याबद्दल कळतं आणि आकाश गाणं ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो, वसुंधराही आकाशची इच्छा पूर्ण करते. डिनर नंतर, आकाश आणि वसू घरी परतत असताना जोरदार पाऊस आणि वादळामुळे ते अडकतात. तिथे एक व्यक्ती वसूची छेड काढण्याचा प्रयत्न करतो. पण आकाश त्याला चांगलंच धडा शिकवतो. इकडे वसूला आकाशचं एक वेगळं रूप दिसतं. पावसामुळे रस्ता बंद झाल्याने ते वसूच्या आई बाबांच्या घरी जातात. तिथे वसूचे बाबा वसूला संपत्तीच्या कागदांबद्दल कळेल म्हणून घाबरतात. पण वसुच्या हाताला तो कागद लागतो तेव्हा समजत की बाबांनी सगळी संपत्ती बनीच्या नावावर केली आहे.                                                             






ही बातमी वाचा : 


जावेद जाफरीच्या मुलामुळे अनंत-राधिकाचं लग्न? म्हणूनच अंबानींकडून मिळाला 30 कोटींचा फ्लॅट गिफ्ट? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण