Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता नवीन वळण येणार आहे. मुक्ता आणि सागरमधील गैरसमज कमी होणार आहेत. तर, दुसरीकडे कार्तिकला तुरुंगात टाकलं म्हणून स्वाती आता मुक्तावर विषप्रयोग करणार आहे. मुक्ताला स्वातीचा कट कळणार का, सावनी पुन्हा एकदा सागरच्या संसारात माती कालवणार का , असे अनेक प्रश्न आता निर्माण होणार आहे. 


स्वातीला कामावर पाठवण्याबाबत मुक्ताने सूचना केल्याने इंद्रा संतापते. सागरही त्यावर चिडतो. तिचा भाऊ खंबीर आहे, आमच्या मॅटरमध्ये मध्ये बोलू नका असे सागर मुक्ताला म्हणतो.


सागर-सईमध्ये सईची मध्यस्थी


घरातल्या प्रकरणावरून मुक्ता नाराज झालेली असते. रात्री झोपताना ती पाण्याची बॉटलही जवळ ठेवत नाही. सागर यावरून तिच्याशी बोलत असतो  तेवढ्यात सई येते आणि सागर-मुक्ताला गोष्ट सांगण्याचा आग्रह धरते. गोष्ट कोण सांगणार यावरून मुक्ता आणि सागरमध्ये गोड भांडण होते. त्यावर सई म्हणते तुमच्यात भांडण झालंय का? सईच्या प्रश्नावर दोघेही नकारार्थी उत्तर देतात. सईला सागर गोष्ट सांगतो. पण, त्या गोष्टीत घरात सुरू असलेल्या वादाचे प्रतिबिंब असते, हे मुक्ताला कळते. सागर मनातल्या मनात मुक्ताची माफी मागतो आणि आपला एकच उद्देश्य आहे, पण पर्याय वेगवेगळे असल्याचे म्हणतो. 


दुसऱ्या दिवशी सकाळी सागर मुक्ताला आजच्या क्लिनिकमधील सगळ्या अपॉईंटमेंट रद्द करून बाहेर फिरायला जाऊया असे म्हणतो. मुक्ताही राजी होते. 


स्वाती घरात नाही, इंद्राची रडारड...


डेटवर जाणार असल्याने सागर-मुक्ता आनंदात असतात. मात्र, त्यांच्या आनंदात खडा पडतो. इंद्रा घरात आरडाओरड करते आणि सगळ्यांना बोलावते. स्वातीने घर सोडून गेली असल्याचे इंद्रा सांगते. स्वाती कुठं गेली असेल यावरून इंद्रा चिंता व्यक्त करते आणि रडारड करते. धीर द्यायला गेलेल्या मुक्तावर इंद्रा चिडते. तुझ्यामुळेच स्वाती घर सोडून गेली असल्याचे इंद्रा सांगते. 


स्वाती देणार मुक्ताला विष?


इंद्राची रडारड सुरू असताना तेवढ्यात स्वाती घरी येते. तिला पाहून इंद्राचा जीव भांड्यात पडतो. त्यावर स्वाती मी भाजी आणायला गेली होती. आता तुमच्या घरात राहणार तर थोडा हातभार लावायला हवा, असे म्हणते. स्वातीच्या म्हणण्यावर इंद्रा, सागर आणि बापू तिची समजूत घालतात. हे घर तुझं असून आजपर्यंत जशी राहत आलीय तसेच राहा असे सागर म्हणतो. स्वाती आज नाश्ता मी तयार करते असे म्हणते आणि किचनमध्ये जाते. स्वाती चहा-नाश्ता तयार करते. पण, चहाच्या एका कपात स्वाती औषध मिसळते आणि तो कप मुक्ताला देते. 


सावनी आदित्यचा पुन्हा वापर करणार


मुक्ता पुन्हा कोळी कुटुंबाच्या घरात गेली असल्याचता विचार करून सावनीचा जळफळाट करते. तिकडे काय सुरू आहे, याचा अंदाज बांधण्यासाठी ती आदित्यचा वापर करते. तुझा पप्पा तुझ्या नव्या मम्मीला प्रायोरिटी देत असून तुला काहीच महत्त्व देत नाही असे सांगते. त्यानंतर आदित्य सागरला फोन करतो आणि एक संपूर्ण दिवस सोबत घालवण्याची गळ घालतो. त्यावर सागर विचारात पडतो. मुक्ताला आदित्यच्या मागणीबाबत सांगतो तर मुक्ता त्याला घरी येण्यास सांगते जेणेकरून सई देखील त्याला भेटेल. आपण बाहेर फिरायला नंतर कधी तरी जाऊ असे सांगते.