Marathi Serial Updates :  मराठीतील छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीसाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. टीआरपीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी वाहिन्यांकडून नवनवीन प्रयोग सुरू आहेत. स्टार प्रवाह (Star Pravah), झी मराठी (Zee Marathi) आणि कलर्स मराठीवर (Colours Marathi) नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. नव्या मालिकांसाठी आता  काही मालिका ऑफएअर जात आहेत. कलर्स मराठीवर 'इंद्रायणी' नंतर आता 'सुख कळले' ही मालिका आणि ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुख कळले' या मालिकेसाठी आता कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका निरोप घेणार आहे. 


पुढील आठवड्यात, 22 एप्रिलपासून सागर देशमुख आणि स्पृहा जोशीची मुख्य भूमिका असलेली 'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका रात्री 9 वाजता प्रसारीत होणार आहे. तर, 'रमा राघव' या मालिकेची वेळ 9.30 वाजता करण्यात आली आहे. तर, 9.30 वाजता प्रसारीत केली जाणारी मालिका 'भाग्य दिले तू मला'ही मालिका ऑफएअर जाणार आहे. 






जवळपास दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  मालिकेतील राज-कावेरीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. आता, ही मालिका ऑफएअर जाणार आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड या आठवड्यात प्रसारीत होणार असून मालिकेची व्रॅपअप पार्टी पार पडली. शूटिंगच्या शेवटच्या दिवसाच्या पार्टीला सगळेच कलाकार भावूक झाले. 






 


'सुख कळले'ची उत्सुकता...


'सुख कळले' (Sukh Kalale) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत स्पृहा जोशी (Spruha Joshi) आणि सागर देशमुख (Sagar Deshmukh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  अभिनेता सागर देशमुख ही या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. स्पृहा जोशी जवळपास वर्षभरानंतर मालिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता ही मालिका कशी असणार, याची उत्सुकता लागली आहे. 


इतर संबंधित बातम्या :