Marathi Serial : मराठी मालिकांमध्ये (Marathi Serial) सध्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. खास विवाह विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath), 'बॉस माझी लाडाची' (Boss Majhi Ladachi) आणि 'स्वाभिमान' (Swabhiman) या मालिकेत लगीनघाई सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. 


माझी तुझी रेशीमगाठ : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश-नेहाची रेशीमगाठ बांधली जाणार आहे. प्रेक्षकांना खास दोन तासांचा विवाह विशेष भाग पाहायला मिळणार आहे. साखरपुडा, संगीत, मेंहेंदी, हळद नंतर प्रेक्षकांना आता यश-नेहाचा शाही विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. 


बॉस माझी लाडाची :  'बॉस माझी लाडाची' मालिकेत मिहीर आणि राजेश्वरी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. बॉस आणि कर्मचारी यांचं लग्न प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच बघायला मिळाले आहे. हर्षे आणि मांजरेकर कुटुंबांत मेहेंदी, हळद, संगीत, बांगड्या भरणे यांबरोबरचच वरमाला, सप्तपदी हे  विधीही प्रेक्षकांना बघायला मिळाले आहेत. 


स्वाभिमान : स्वाभिमान मालिकेत पल्लवी आणि शांतनूच्या लग्नाची धामधूम प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पल्लवी आणि शांतनूने संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने सप्तपदी घेतल्या आहेत. लग्नातल्या दोघांच्या पारंपरिक लूकला विशेष पसंती मिळाली होती. पल्लवी- शांतनूच्या आयुष्यात जरी आनंदाचे क्षण आले असले तरी मोठ्या आईच्या मनात मात्र नवं कटकारस्थान सुरू आहे. सहा महिन्यांच्या आत पल्लवीचे सूर्यवंशी घराण्यासोबत असलेले संबंध तोडायला लावण्याची शपथ मोठ्या आईने घेतली आहे. त्यामुळे स्वाभिमान मालिकेचे यापुढील भाग उत्कंठावर्धक असणार आहेत. 


संबंधित बातम्या


Gajar Kirtanacha : पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्यातून प्रेक्षकांना मिळणार कीर्तनाचा आनंद


Marathi Serial : 'या' आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती? जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट