Marathi Serial:  छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मराठी मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही मालिकांमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी रोमँटिक सीन्स देखील दाखवले जातात. पण अनेक वेळा रोमँटिक सीन्समुळे मराठी मालिकांना ट्रोल देखील केले जाते. जाणून घेऊयात अशा मराठी मालिकांबद्दल, ज्यांमधील रोमँटिक सीन्स पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या...


'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) 


सुख म्हणजे नक्की काय असतं  या मालिकेत जयदीप-गौरी यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळते. या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रोमोमधील रोमँटिक सीननं अनेकांचे लक्ष वेधले होते. या प्रोमोला कमेंट करुन अनेकांनी  सुख म्हणजे नक्की काय असतं  या मालिकेला ट्रोल केलं होतं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आमच्या कुटुंबियांसोबत आम्ही सीरिअल बघतो. प्लिज असले सीन्स नका दाखवू, मालिकेत लहान आर्टिस्ट आहेत, त्यामुळे आमची छोटी मुलं पण सीरिअल बघतात.' 'सुख म्हणजे नक्की काय असतं'  या मालिकेत जयदीप ही भूमिका मंदार जाधव साकारतो तर गौरी ही भूमिका गिरिजा प्रभू साकारते.  माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार देखील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत भूमिका साकारतात.




तू तेव्हा तशी (Tu Tevha Tashi)


तू तेव्हा तशी या मालिकेतील एका रोमँटिक सीनची चर्चा देखील सोशल मीडियावर झाली होती.  या सीनमध्ये सौरभ आणि अनामिका यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. तू तेव्हा तशी या मालिकेच्या प्रोमोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली होती,  "कौटुंबिक सीरियलमध्ये हे असे सीन नका दाखवू" तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये अभिनेता  स्वप्नील जोशीनं (Swapnil Joshi)  सौरभ ही भूमिका साकारली होती. तर या मालिकेतील अनामिका ही भूमिका शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) साकारली होती.  अभिज्ञा भावे, सुहास जोशी या कलाकारांनी देखील या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.




महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'आम्ही कुटुंबियांसोबत ही सीरिअल बघतो, हे असे सीन्स...' ;'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील रोमँटिक सीन पाहिल्यानंतर भडकले नेटकरी