Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकताच या मालिकेत प्रेक्षकांना एक ट्विस्ट पाहायला मिळाला. शलाकाने दीपूला अखेर नयन आणि स्नेहलताने छळ केल्याचं सत्य सांगितलं आहे. त्यामुळेच दीपू शलाकाला घेऊन देशपांडे सरांकडे राहायला येणार आहे. 


अखेर दीपिका आणि इंद्रा शलाकाला वाचवण्यात यशस्वी झाले आहेत. नयन आणि स्नेहलताने शलाकाचा खूप छळ केला आहे. दीपूला याचा प्रचंड राग येतो. त्यामुळे ती नयनच्या कानाखाली मारते. शलाकाला वाचवण्यात दीपिका आणि इंद्रा यशस्वी झाले असले तरी इंद्राने शलाकाचा संसार मोडला असे आईला वाटते.





'मन उडू उडू झालं' मालिकेत सध्या इंद्रा-दीपूला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.


संबंधित बातम्या


30 Years of Akshay Kumar: अक्षय कुमारने चित्रपटसृष्टीत पूर्ण केली 30 वर्षे, 'पृथ्वीराज'चं नवं पोस्टर रिलीज


Me Honar Superstar - Chhote Ustaad : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चा महाअंतिम सोहळा; संगीतकार आणि स्टार प्रवाह परिवाराची खास उपस्थिती


Hariom : नवयुगातील मावळे; 'हरिओम' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला