Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) या मालिकेत सध्या नव-नवीन ट्विस्ट येत असून सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या या मालिकेतून काही पात्रांची एक्झिट झाली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे इंद्रा-दीपूचे चाहते नाराज झाले आहेत. 


'मन उडू उडू झालं' या भागाचा शेवटचा भाग 13 ऑगस्टला टेलिकास्ट होणार आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील 'मन उडू उडू झालं' ही मालिका पहिल्या दहा क्रमांकात आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असूनदेखील ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. 


'मन उडू उडू झालं' जागी 'तू चाल पुढं' होणार सुरू


'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 


देशपांडे सरांनी केला इंद्रा-दीपूच्या प्रेमाचा स्वीकार


'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात देशपांडे सरांनी इंद्रा-दीपूच्या प्रेमाचा स्वीकार केलेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता मालिकेत लगीनघाईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता इंद्रा-दीपूचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेतून सोनटक्के सरांनी घेतला निरोप; अजिंक्यने केली खास पोस्ट


Man Udu Udu Zhala : प्रतीकच्या परवानगीने इंद्रा करणार दीपूसोबत लग्न; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात