Tejaswini Pandit on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (दि. 14) 57 वा वाढदिवस आहे. या वाढदिनी त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे नेते आणि सर्व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दुसरीकडे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्याची संधी सोडलेली नाही. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरेंसोबतचा खास फोटो शेअर करत हटके कॅप्शन लिहिलंय. 

तेजस्विनी पंडितने लिहिलं की, मराठी अस्मितेच्या पाठीराख्याला, मराठी भाषेच्या पोषिंद्याला, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राला आणि ह्या सगळ्या पलीकडे एका मनस्वी ,सच्च्या, अनोख्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा ! राजसाहेब खरंच, तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केंव्हाच सोडून दिलं !देव तुम्हाला दीर्घायु देवो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ! हसत रहा 💖

देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देताना म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुरलीधर मोहोळ म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! उत्तम आरोग्य आणि उदंड आयुसाठी अनेकानेक सदिच्छा !
 
रोहित पवार म्हणाले, आपल्या वक्तृत्वाने मराठी मनावर छाप पाडणारे मनसेप्रमुख मा. राज ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या मनातील महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्न मशालीप्रमाणे कायम धगधगत राहो आणि हे स्वप्न रेल्वेइंजिनाच्या वेगाने साकार होवो, ही सदिच्छा! त्यासाठी आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!
 
काँग्रेस नेते विश्वजीत कदम म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष मा. राज ठाकरे जी आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना !
 
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! उत्तम निरामय आरोग्य आणि उदंड आयुष्यासाठी अनेकानेक सदिच्छा !

 

 

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : गौतमी पाटीलचा अजित कुमारसोबत आजवरचा सर्वात रोमँटिक सीन, म्हणाली, अंगाला हात न लावता करेक्ट फिटिंग

करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती होता अमेरिकन? कागदपत्रांमुळे पार्थिव भारतात आणण्यास होणार उशीर?