Ramayan Vishwamitra Role: 'रामायण' चित्रपटाची राध्या एकच चर्चा आहे. नमित मलोत्रा दिग्दर्शित 4000 कोटींचं बजेट अरणाऱ्या ' रामायण ' या चित्रपटाच्या स्टारकास्टची एकच चर्चा सुरुय. प्रभू श्रीराम ची भूमिका साकारणारा रणबीर कपूर असेल, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी तसेच अनेक मराठी कलाकारांची या बिग बजेट चित्रपटात असलेल्या भूमिकांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे.काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, चित्रपटात मराठी अभिनेते अजिंक्य देव महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते विश्वामित्राच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, चित्रपटावर सोशल मीडियावर सध्या वापसलेल्या ट्रॉलिंगवरती अभिनेते अजिंक्य देव बोलले आहेत. 

Continues below advertisement

काय म्हणाले अजिंक्य देव ? 

अभिनेते अजिंक्य देव म्हणाले ' टीका कशावर होत नाही.प्रत्येक माणसाला आपल्या वर्चस्व दाखवून द्यायची इच्छा असते.मग जर ती सरळ पद्धतीने नाही झाली तर..हे सगळे घटक सोसायटीमधील आहे. यांचा पण स्वागत केलं पाहिजे. त्यांच्याकडूनही काही ना काही शिकायला मिळतं.कुठे ना कुठे लोक काहीतरी दाखवतात. काहीतरी पॉईंट आऊट करतात. त्या कधी चुका असतात तर कधी नसतातही..त्यांना पण हे करून थोडेफार लाईक डिसलाईक मिळतात.ते खुश होतात आणि आम्हीही खुश होतो.' असं ते म्हणाले. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

Continues below advertisement

ते पुढे म्हणाले," शेवटी मराठी चित्रपटाचा परिणाम थिएटरमधून बाहेर पडताना कसा आहे, यावर सगळं राहतं.शेवटी चित्रपट या ट्रोलिंगमुळे चालत नाही किंवा चालतो असं काही नाही.जर तुमची फिल्म चांगली असेल तर ती नक्कीच चालते.शेवटी रामायण बद्दल मी एवढेच सांगेल की 'या सगळ्या गोष्टी अगदी कटाक्षाने,रामायण कसं असावं किंवा रामानंद सागर यांनी जेव्हा रामायण बनवलं 1987 मध्ये.. 40- 50 वर्षांनंतर हा सिनेमा येणार आहे. त्यामध्ये तीच पवित्रता आहे. मला खात्री आहे ज्या आस्थेने लोकांनी त्यावेळी रामायण पाहिलं होतं. आजही ते त्याचा आस्थेने रामायण पाहण्याला पसंती देतील.'

रामायण चित्रपटात अभिनेते अजिंक्य देव विश्वामित्राची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष आहे. रामायण ट्रेलरनंतर या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे.