Ketaki Chitale : लोकसभेच्या निकालानंतर संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये बरीच खडाजंगी होत आहे. त्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. त्यावर सत्ताधाऱ्यांकडूनही राहुल गांधी यांना चोख उत्तर देण्यात आलं. पण या सगळ्यावर गोंधळावर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 


केतकीने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच तिने सनातनींना जागे व्हा असं निक्षून सांगितलं देखील आहे. यामध्ये केतकीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांच्यावर संतापही व्यक्त केला आहे. केतकी ही कायमच अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असते. त्यातच आता संसदेतील गोंधळावर देखील तिने भाष्य केलं आहे. 


केतकीने काय म्हटलं?


केतकीने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर संताप व्यक्त केला. तिने म्हटलं की, 'आज राहुल गांधी यांनी संसेदत जो हिंसक आहे तो कधीच हिंदू होऊ शकत नाही, असं म्हटलं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, आमचे सगळे देव-देवता हिंदू नाहीत? ते सनातनी नाहीत? त्यांनी राक्षसांना मारलं म्हणून तुम्हाला असं म्हणायचं आहे का? कालीमाता जिची आपण पूजा करतो, जिला शक्तीच्या रुपात पुजलं जातं, ती सनातनी नाही का?'


पुढे तिने म्हटलं की, 'शिवजींचा एक फोटो घेऊन ते म्हणतात की, शिवजींनी असं म्हटलं आहे की, घाबरु नका. हे शिवजींनी कधी म्हटलं. संपूर्ण हिंदू समाजाचा तुम्ही अशा प्रकारे अपमान करता तेव्हा हे सगळं चालतं का? तिचे पश्चिम बंगलामध्ये टीएमसीच्या आमदार एका महिलेला मारहाण होत असताना सरळ म्हणतात की, मुस्लिम राष्ट्रात अशा गोष्टी चालतात. मुस्लिम राष्ट्र? आणि जर आम्ही हिंदुराष्ट्राची मागणी केली तर तुम्ही आम्हाला भगवे दहशतवादी म्हणता.हे सगळं चालतं, कारण आम्ही सनातनी झोपून आहोत, आम्ही कधीच जाग येणार नाही.'






राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?


 राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, 'नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटलं की हिंदुस्ताननं कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असं म्हटलं. भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही, हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटलंय सत्याची साथ द्या.'  


ही बातमी वाचा : 


Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....