मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत आज अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहिली. आता या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीनंतर कंगना रनौतकडून न्यायाधीश बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगनाने आरोप केले आहेत. आजच्या सुनावणीत कंगना कोर्टापुढे हजर झाली नाही तर तिच्या नावे अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला दिली होती.  या खटल्याविरोधात कंगनानं दाखल केलेली याचिका नुकतीत मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती.


जावेद अख्तर यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या मानहानी प्रकरणात कंगना आज अंधेरी कोर्टात पोहोचली.  कंगनानं जावेद अख्तर यांच्यावर खंडणी आणि धमकी दिल्याचा आरोप केला. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितलं की, जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावून धमकी दिली. मात्र कंगना त्यावेळी काही बोलली नाही. मात्र आता तिनं आपल्या तक्रारीत हे नमूद केलं आहे.  वकिलांनी सांगितलं की, कंगनानं म्हटलंय की, जर जावेद अख्तर यांना या प्रकरणाशी काही देणं घेणं नव्हतं तर ते हृतिक- कंगना प्रकरणात का आले. कंगना आणि रंगोलीला आपल्या घरी का बोलावलं? असा सवालही वकिलांनी केला.


अंधेरी कोर्टाच्या न्यायाधीशांवर कंगनानं गंभीर आरोप केले आहेत. न्यायाधीश वारंवार कंगनाला कोर्टात का बोलावत आहेत. वॉरंट जारी करण्याची धमकी दोन वेळा दिली गेली.  तिचे वकील प्रत्येक सुनावणीला हजर होते. कंगना देखील याआधी कोर्टात आली होती. मग आता परत तिला बोलवायची गरज काय? असं तिच्या वकिलांनी सांगितलं. या न्यायाधीशांवर विश्वास नाही, त्यांना बदलण्याची मागणी कंगनानं वकिलांमार्फत केली आहे.  


आजच्या सुनावणीत कंगना कोर्टापुढे हजर झाली नाही तर तिच्या नावे अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला दिली होती.  या खटल्याविरोधात कंगनानं दाखल केलेली याचिका नुकतीत मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. तसेच दंडाधिकारी न्यायालयाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळाही दिला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत कंगनाला दंडाधिकारी न्यायालयात हजर रहाणं बंधनकारक होतं. 


Javed Akhtar Controversy: जावेद अख्तर यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी 
 
काय आहे याचिका?


कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. यामध्ये न्यायालयानं खटल्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी कंगनानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली असून दंडाधिकारी कोर्टानं नियमबाह्य पध्दतीनं ही कारवाई केल्याचा आरोप कंगनानं या याचिकेतून केला होता. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. अख्तर यांच्यावतीनं दंडाधिकारी न्यायालयानं याप्रकरणी केलेली कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. तसेच अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचं पूर्ण पालन करण्यात आलं आहे आहे, असा दावा केला आहे. मात्र निव्वळ पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, न्यायालयाने स्वतंत्र चौकशी केली नाही, असा बचाव कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला होता.


Tejas Shooting : कंगना रनौत आता मिशन 'तेजस' वर, पायलटच्या गणवेशातील फोटो शेअर करत चाहत्यांना दिली माहिती


काय आहे प्रकरण?


कंगनानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावरही ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहिन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. न्यायालयानं याची दखल घेत जुहू पोलीस ठाण्याला यावर चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर पोलिसांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे की अख्तर यांच्या या तक्रारीत तथ्य आहे. त्यामुळे न्यायालयाने कंगनाला फेब्रुवारीमध्ये समन्स बजावलं आहे. अंधेरी न्यायालयात यावर 14 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे ज्यात आता कंगनाची हजेरी अनिवार्य राहील.