Ekta Kapoor Explains Her Decision to Stay Single: टीव्ही क्वीन एकता कपूरला कोणत्याही खास ओळखीची गरज नाही. तिनं अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मालिकांव्यतिरिक्त एकता कपूर तिच्या वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते. ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. परंतु, एकता कपूर अजूनही सिंगल लाइफ जगत आहे. अभिनेता जितेंद्र यांच्या दोन्ही मुलांनी लग्न केले नाही. एकता कपूर आणि तुषार कपूर या दोघांनी अद्याप लग्न केले नाही. चाहते कायम दोघांना लग्नाबाबत प्रश्न विचारतात.  दरम्यान, अलिकडेच एकता कपूरने स्वत:च लग्नाच्या प्रश्नाबाबत उत्तर दिले आहे.  तसेच लग्न  न करण्यामागचं कारण सांगितले आहे. 

एकता कपूरने अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये करिअर, टीव्ही शो आणि कास्टिंगबद्दल  उघडपणे भाष्य केले आहे. तिनं या पॉडकास्टद्वारे पहिल्यांदाच लग्न न करण्यामागचं कारण उघड केले आहे.  एकताने खुलासा केला की, तिने आणि तिचा भाऊ तुषारने अद्याप लग्न केलेले नाही. दोघेही कामात व्यस्त राहणे योग्य मानतात, असं तिनं सांगितलं.  एकताला टीव्ही क्विन म्हणून ओळख मिळाली.  तिनं मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. मात्र, तिनं सिंगल लाइफ जगणं निवडलं. कामामध्ये व्यग्र राहणं तिला पसंत असल्याचं तिनं सांगितलं.

 

तिनं पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, 'जेव्हा मी 18 वर्षांची होती, तेव्हा वडिलांनी आयुष्यात काहीतरी करायला सांगितले होते. नाहीतर मी तुझे लग्न लावेन.  वडिलांचे हे शब्द माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. लग्न टाळण्यासाठी मी काम करण्याचा मार्ग निवडला. तेव्हा माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती की मला लग्न करायचे आहे. मला कोणत्याही नात्यात अडकायचे नव्हते", असं एकताने आपल्या पॉडकास्टमध्ये स्पष्ट केलं.

एकताचे हे विधान सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. तिनं या पॉडकास्टमधून करिअरविषयी अनेक  खुलासे केले. एकताने दिलेली मुलाखत सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली. दरम्यान, एकता लग्न करणार की नाही? केले तर एकता कधी लग्नाच्या बेडीत अडकणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा; त्याची स्वप्नसुंदरी कोण? खास फोटो सोशल मीडियात व्हायरल