वाजपेयींना पाच दिवसांनी श्रद्धांजली, सलमान खान ट्रोल
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2018 11:22 AM (IST)
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर पाच दिवसांनी सलमानने ट्विटरवरुन श्रद्धांजली दिली, त्यामुळे 'टायगर सो रहा था' अशाप्रकारच्या कमेंट्स ट्विटरवर केल्या जात आहेत.
मुंबई : दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यात दिरंगाई केल्याने अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल झाला. वाजपेयींच्या निधनानंतर पाच दिवसांनी सलमानने ट्वीट केलं. त्यामुळे 'टायगर सो रहा था' अशाप्रकारच्या कमेंट्स ट्विटरवर केल्या जात आहेत. सलमान सध्या 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त माल्टामध्ये आहे. काल, म्हणजेच 21 तारखेला रात्री सलमानने अटल बिहारी वाजपेयी यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली. 'अटलजी यांच्यासारखे दिग्गज नेते, आदर्श राजकारणी, वक्ते आणि अतुलनीय माणूस गमावणं ही खरंच एक दुःखद भावना आहे' अशा आशयाचं ट्वीट सलमानने केलं. फीलिंग हा शब्द लिहितानाही सलमानने गफलत केली. feeling ऐवजी feeing अशी स्पेलिंग मिस्टेक सलमानने केली. अटल बिहारी वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी दिल्लीतील 'एम्स'मध्ये 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. देश-परदेशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांपासून सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र तब्बल पाच दिवस उशीर केल्याने सलमानची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली.