मुंबई: बॉलीवूडची हिट जोडी करीना आणि सैफ आली खानचे प्रेम प्रकरण सर्वांनाच माहित होते. पण या दोघांनी जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हा तिचा हा निर्णय ऐकून करीश्माला धक्का बसला होता.


 

राजाबाबू, कुली नंबर वनसारखे जबरदस्त हिट चित्रपट देणाऱ्या करीश्माच्या मते, करीनाच्या या निर्णयामुळे ती आणि तिची आई बबिता कपूर  दोघेही शॉक झाल्या होत्या.

 

''आमचं कुटुंब परंपरांना मानणारं आहे. पण तरीही बेबोच्या निर्णयाचा सर्वांनीच सन्मान केला. ती अतिशय इमोशनल आणि मनापासून निर्णय घेते. त्यामुळे तिचा निर्णय योग्य असतो. हे सर्व कुटुंबीयांना माहित आहे,'' असे करीश्माने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

 

2008 साली या दोघांनीही डेटवर जाण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी चार वर्षांनी लग्न केले. आता करीना आई बनणार असल्याचे वृत्त आहे.

 

इतकेच नाही, तर ती 'वीर द वेडिंग' या चित्रपटात सोनम कपूरसोबत दिसणार आहे. करीनाच्या व्यतिरिक्त तिच्या सोबत स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानियाही दिसणार आहेत. 'वीर द वेडिंग' या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनमची बहीण रिया कपूरने केले आहे.