Jaya Bachchan On Aishwarya Rai: सध्या बच्चन कुटुंब त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरंच चर्चेत आलं आहे. ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक (Amitabh Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. त्यांच्या सोशल मिडिया पोस्ट, कार्यक्रमांना वेगवेगळी लागत असणारी हजेरी, या सगळ्यामुळे त्यांच्या नात्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यातच आता जया बच्चन यांच्या एका जुन्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झालीये. 


ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत वेगळी राहत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याचप्रमाणे या दोघींचा बच्चन कुटुंबासोबत सध्या कोणाताही संवाद होत नसल्याचंही म्हटलं जातंय. या सगळ्या दरम्यान जया बच्चन यांच्या एका जुन्या वक्तव्याची चर्चा सुरु झालीये. जया बच्चन यांनी म्हटलं होतं की, अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायला कधीही आपली सून मानली नाही.


'अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला कधीही आपली सून मानले नाही...'


ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 2007 मध्ये लग्नगाठ बांधली आणि काही वर्षांनी त्यांनी त्यांची मुलगी आराध्याला जन्म दिला. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात काहीच अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. या सगळ्या दरम्यान जया बच्चन यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला कधीही त्यांच्या सून सारखे वागवले नाही.जया बच्चन एकदा करण जोहरच्या वादग्रस्त चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये दिसल्या होत्या. यादरम्यान जया बच्चन यांनी खुलासा केला होता की, जेव्हा श्वेता बच्चन लग्न करून घराबाहेर पडली तेव्हा अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यात पोकळी जाणवली. ऐश्वर्या त्यांच्या घरी आल्यावर त्यांची मुलगी होण्याची इच्छा पूर्ण झाली, अमिताभ नेहमीच ऐश्वर्याला आपली सून नव्हे तर आपली मुलगी मानतात. 


अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घेणार ग्रे घटस्फोट?


काही दिवसांपूर्वी अभिषेकने सोशल मीडियावर घटस्फोटाच्या पोस्टला लाईक करून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अभिषेकने लाईक केलेली घटस्फोट पोस्ट ग्रे घटस्फोट आणि दाम्पत्याच्या आयुष्यावर त्याचा परिणाम याविषयी होती. यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले की ऐश्वर्या आणि अभिषेकही ग्रे घटस्फोट घेणार का? 'ग्रे डिव्होर्स' हा घटस्फोट आहे जेव्हा एखादे जोडपे अनेक वर्षे एकत्र घालवल्यानंतर वेगळे होतात. जेव्हा जोडपे 50 वर्षांचे होतात तेव्हा हे घटस्फोट होतात. याव्यतिरिक्त, दीर्घकाळ एकत्र घालवल्यानंतर विभक्त झालेल्या जोडप्याला सिल्व्हर स्प्लिटर म्हणून लेबल केले जाते. 


ही बातमी वाचा : 


Shubhangi Gokhale : मला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही हे सांगणारे तुम्ही कोण? गणेशोत्सवावरील वक्तव्यावर झालेल्या ट्रोलिंगनंतर शुभांगी गोखलेंचा सवाल