TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख काळाच्या पडद्याआड


मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्व गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे आज निधन झाले. मराठीतील प्रसिद्ध दिवगंत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. वत्सला देशमुख यांनी त्यांच्या प्रदीर्ष नाट्य आणि सिनेसृष्टीच्या प्रवासाने एक काळ गाजवला होता.


अजय देवगण आणि बिग बींच्या 'रनवे 34' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज


बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अजय देवगण  यांच्या आगामी 'रनवे 34' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. तर सिनेमा 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये अजय देवगणपासून अमिताभ बच्चन पर्यंत सगळेच कलाकार अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. 


पहिल्याच दिवशी 'द कश्मीर फाइल्स'ची बॉक्स ऑफिसवर जादू


बहुचर्चित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
630 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर दिवस-रात्र  'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचे शो सुरू आहेत. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 3 कोटी 55 लाखांची कमाई केली आहे. 


प्रभासच्या 'राधे श्याम' चित्रपटाची जादू


प्रभासचा 'राधे श्याम' हा चित्रपट नुकताच शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. प्रभास आणि पूजा हेगडेची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते डोळे लावून बसले होते. राधे श्याम चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या बिग बजेट चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. राधे श्याम चित्रपट पहिल्या दिवशी हिंदी भाषेत चाहत्यांना प्रभावित करण्यात कमी पडला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, राधे श्यामने हिंदी भाषेत बॉक्स ऑफिसवर सुमारे 4.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. 


आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच घेणार सात फेरे


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर  यांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. आलिया आणि रणबीर या दोघांचेही लग्न लवकर व्हावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने चाहत्यांची निराशा होत आहे. आलियाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिच्या मनात रणबीरसोबत लग्न झाले आहे, तेव्हा चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता. अशा परिस्थितीत दोघेही प्रत्यक्षात जेव्हा सात फेरे घेतील, तेव्हा काय होईल याची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र चित्रपटानंतर रणबीर आणि आलिया लगेचच लग्नगाठ बांधू घेऊ शकतात असं बोललं जात आहे.


संबंधित बातम्या


Virajas Kulkarni : व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून… 'व्हिक्टोरिया'साठी विराजसची खास पोस्ट!


FIR : ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला विष्णू विशालचा 'एफआयआर' सिनेमा


Jhund : 'झुंड' काढण्यासारखं थोडं काही,वेचण्यासारखं खूप काही, लेखक क्षितिज पटवर्धनांनी सकारात्मक बाजू आणली प्रेक्षकांसमोर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha