मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या अफेयरची जोरदार चर्चा सुरु आहे. दोघेही सतत एकत्र फिरताना दिसतात. एकमेकांच्या घरच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधान आले आहे. परंतु दोघांनी त्यांच्या नात्याला कधी दुजोरा दिला नाही. परंतु एका कार्यक्रमात अर्जुनला करण जोहरने तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारला यावर अर्जुनने दिलेल्या उत्तरामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची आणि लग्नाची चर्चा होऊ लागली आहे.


करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये अर्जुन आणि त्याची सावत्र बहिण जान्हवी कपूर दोघांनी हजेरी लावली होती. यावेळी करणने जान्हवी आणि अर्जुनला अनेक खोचक प्रश्न विचारले. तसेच अर्जुनला तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना अर्जूनने 'मी सिंगल नाही' असे म्हटले. यावर करणने थेट विचारले की, 'तू लग्नासाठी तयार आहेस का?' यावर अर्जुनने मान डोलावून होय असे उत्तर दिले.

यानंतर आता अर्जुन आणि मलायकाच्या नात्यासह लग्नाचीदेखील चर्चा रंगू लागली आहे. पुढच्या वर्षात कपूर कुटुंबात लगीनघाई पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मलायकाने अभिनेता अरबाज खानपासून वर्षभरावूर्वी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ आले. मलायका आत्ता 45 वर्षांची आहे तर अर्जुनचे वय 33 आहे.