मुंबई : काही महिन्यांपूर्वीच भारताचा नागरिक झालेला गायक अदनान सामीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्याचं अभिनंदन केलं आहे. दहशतवादाविरोधात पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याच्या कामगिरीचं अदनानने कौतुक केलं आहे.

फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ


"दहशतवादाविरुद्ध जबरदस्त, नियोजनपूर्वक आणि यशस्वी कारवाईबद्दल पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचं खूप खूप अभिनंदन," असं ट्वीट अदनान सामीने केलं आहे.


https://twitter.com/AdnanSamiLive/status/781613090991321089

फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला!


मूळचा पाकिस्तानचा असलेला गायक अदनान सामी 1 जानेवारी 2016 रोजी भारताचा नागरिक बनला आहे. गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी सामीला भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रं दिली होती.

फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार


27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले.

भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वच राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडूंनी सैन्य आणि पंतप्रधानांचं कौतुक करत आभार मानले आहेत. आता त्यात गायक अदनान सामीचाही समावेश झाला आहे.

फोटो : आमच्या शूर सैन्याला सलाम : अदनान सामी


दरम्यान, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनेही प्रतिक्रिया दिली आहे. "पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे. ज्या गोष्टी चर्चेमुळे सुटू शकतात, त्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलण्याची गरज काय? पाकिस्तानला सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. जेव्हा दोन शेजारी देश भांडतात, तेव्हा दोन्ही देशांचं नुकसान होतं. से नो टू वॉर", असं ट्वीट आफ्रिदीने केलं आहे.

संबंधित बातम्या

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शाहिद आफ्रिदी म्हणतो...


सर्जिकल स्ट्राईकनंतर आज पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक


सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली


भारत-पाकिस्तान सीमा कुठून कुठपर्यंत?


होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी


चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात


वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द


पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं


मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे


सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?


भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती?


सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?


ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना


भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट


अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन


काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष