Ankita Walawalkar : बिग बॉसच्या घरातून (Bigg Boss Marathi Season 5) अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) ही 70 दिवस पूर्ण करुनच बाहेर पडली. घरातील सुरुवातीच्या अंकिताच्या खेळावर अनेकांनी टीकाही केली होती. पण नंतर जसा जसा अंकिताला खेळ कळत गेला तसं तिने तिच्या भूमिका घेण्यास सुरुवात केली. घरातून बाहेर आल्यानंतरही घरातील अनेक गोष्टींचा खुलासा अंकिता केला आहे. पण नुकतच तिने तिचा एक व्लॉग शेअर केला असून यामध्ये तिने अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकरांसोबत झालेल्या भेटीवरही तिने भाष्य केलंय. 


अंकिता बिग बॉस मराठीचा सीझन पाहणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच ती हा सीझन का पाहणार नाही याचंही कारण तिने दिलं आहे. महेश मांजरेकरांना भेटल्यानंतर त्यांनी विश्वास दिल्याचं यावेळी अंकिताने सांगितलं आहे. त्यामुळे घरातून बाहेर आल्यानंतर घरातल्या अनेक गोष्टींवर अंकिताने पहिल्यांदाच तिच्या व्लॉगमध्ये भाष्य केलंय. 


'...तर माझं डोकं फिरेल '


अंकिताने म्हटलं की,मी बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर एकही एपिसोड पाहिला नाही. पण घरच्यांच्या बोलण्यावरुन, माझ्या बहिणी आणि कुणाल जे प्रश्न मला विचारतोय...,त्यावरुन कळतंय की, काय दाखवलं आणि काय नाही ते... मला असं वाटतंय की, आम्ही ज्या सीझनमध्ये होतो तो सीझन जर मी पूर्ण बघितला तर माझं डोकं फिरेल आणि त्यानंतर वेगळंच काहीतरी होईल. म्हणून गप्प राहण्यासाठी मी तो सीझन न बघणं हाच एकमेव उपाय आहे. 


'त्यांच्याकडून जे उत्तर हवं होतं ते मिळालं...'


पुढे त्यांनी म्हटलं की, 'मी महेश सरांना सुद्धा भेटले आणि मला खूप छान वाटलं त्यांना भेटून.. मी त्या गेममध्ये काही चुकीचं तर नाही वागले ना किंवा त्या गेमध्ये मी काही चुकीचं तर नाही ना केलं हे मला त्यांच्याकडून ऐकायचं होतं. त्यांच्याकडून मला जे हवं ते उत्तर मला मिळालं आणि त्या उत्तराने मला विश्वास मिळाला. महेशसरांच्या उत्तरामुळे घरात मी बरोबर होते, हे कळालंय.' 






ही बातमी वाचा : 


Suraj Chavan : महाराष्ट्रभरातून प्रेम मिळालं तरीही पहिल्या सिनेमावर अन्याय? सूरज चव्हाणने प्रेक्षकांना केली कळकळीची विनंती