Marathi Actress :  दररोज लाखो लोक मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करतात. त्यामुळेच मुंबईची लाईफलाईन असलेली ही लोकल दररोज अनेकांना वेळवर ऑफिस किंवा नियोजित ठिकाणी जायला मदत करते. त्यामुळेच बऱ्याचदा गाडीने प्रवास करण्यापेक्षा लोकं लोकलने जाणं जास्त पसंत करतात. वेगवान आणि सोपा प्रवास अशी मुंबई लोकलची ओळखच आहे. त्यामुळे अनेक कलाकार मंडळीदेखील (Marathi Actor) त्यांच्या शुटींगच्या वेळा गाठण्यासाठी आजही मुंबई लोकलनेच प्रवास करतात. याच मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता एसी लोकलची देखील सुविधा सुरु करण्यात आली आहे. 


पण एसी लोकलमुळे साध्या लोकलचं वेळापत्रक अनेकदा कोलमडतं. त्यामुळे बऱ्याचदा प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कधी कधी तर एसी लोकलचं तिकीट काढूनही साध्या लोकलनेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे पैसे आणि वेळ दोन्हीही वाया जातात. असाच काहीसा अनुभव एका मराठी अभिनेत्रीला आला. 36 गुणी जोडी, नवरी मिळे हिटरला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अक्षता आपटेने तिचा हा अनुभव शेअर केला आहे. तसेच तिने या सगळ्या प्रकरावर तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. 


अक्षताने पोस्टमध्ये काय म्हटलं?


अक्षताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'मध्य रेल्वेवर AC trains एकतर वेळेवर तरी याव्यात, नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर TC ने तिकीट नसेल तर… दंड न घेता प्रवाशांकडे असलेलं साधं किंवा First Class चं तिकीट तिथल्या तिथे upgrade करून द्यावं.AC train पकडण्याच्या तयारीत AC चं तिकीट काढलं तर ट्रेन येता येत नाही, वाट बघण्यात वेळ वाया जातो आणि शेवटी साधीच गाडी पकडून यावं लागतं, AC ट्रेनच्या तिकिटाचे पैसे वाया जातात आणि ‘जाऊदे आता AC train कधीच निघून गेली असेल’ असं म्हणून साधं किंवा even First Class च तिकीट असेल तर नेमकी (भयंकर late असलेली) AC train तेव्हा येणार.'


'यात चूक कोणाची ?'


'घाईघाईत तिकीट विंडोवर जाऊन तिकीट काढून येण्याइतपत वेळ नसतो, आणि प्रत्येक स्थानकावर ATVM मशीन सुद्धा नसतं. अशावेळी त्या ट्रेनमध्ये चढून TC फक्त 15/- चा फरक असला तरीही दंड आकारणार. म्हणजे तेही पैसे आपली काही चूक नसताना जावेत.असा गोंधळ माझ्या बाबतीत अनेकदा झालाय. म्हणजे मी First Class चं तिकीट असताना शिस्तीत दंड सुद्धा भरलाय आणि अचानक indicator वर unexpectedly AC train दिसल्यावर दादरला ८ नं. वरुन धावत वर जाऊन main window वर जाऊन तिकीट काढून येईपर्यंत train गेलीए. या दोन्ही cases मध्ये AC train भयंकर उशिरा होती आणि मला खरंच कुठेतरी पोहोचण्याची घाई होती.पैसे वायाच दोन्हीकडे.यात चूक कोणाची ?' असा सवालही अक्षताने विचारला आहे. 


trains इतक्या बेभरवशाच्या वेळेत आल्या तर कसं चालेल?


पुढे तिने म्हटलं की, 'वाहतूक कोंडी कमी व्हावी, प्रवासाचा वेळ वाचावा आणि थोडा आरामदायी प्रवास व्हावा म्हणून चालू केल्या आहेत ना AC ट्रेन्स? त्यासाठी प्रामाणिकपणे तिकीटाचे एवढे पैसे खर्च केल्यावर इतक्या rare trains इतक्या बेभरवशाच्या वेळेत आल्या तर कसं चालेल?? उलट त्या तर top priority असल्या पाहिजेत ना… काय वाटतं? आणि M-indicator सुद्धा अशावेळी नेमकं कसं माती खातं के कळत नाही!' 






ही बातमी वाचा : 


Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट