Marathi Serial : छोट्या पडद्यावर ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेतील रोजचे नवे कथानक, नवे ट्विस्ट आणि टर्न्स ‘आई कुठे काय करते’ला आणखी मनोरंजक बनवत आहेत. या मालिकेत सध्या ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ तिच्या स्वप्नांच्या दिशेन नवी भरारी घेताना दिसतेय.


मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र, आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळाली आहे. आता अरुंधती देशमुखांचे घर सोडून वेगळ्या घरात राहायला गेली आहे. अरुंधतीचे हे नवे घर सजवायला देशमुख कुटुंबातील सदस्य देखील जाणार आहेत. मात्र हे पाहून कांचन, अनिरुद्ध आणि अभिचा जळफळाट होणार आहे.



अभिला अरुंधती दाखवणार इंगा!


घरातील सगळे सदस्य अरुंधतीकडे गेलेले पाहून अभिषेकला देखील राग येतो. अनघा देखील अरुंधतीकडे गेलीये हे ऐकून तो संतापतो आणि तडक तिच्या घरी जातो. यावेळी आपल्या कुटुंबासोबत आशुतोषला पाहून त्याचा संताप अनावर होतो. यावेळी अभिषेक आशुतोष आणि अरुंधतीच्या नात्यावर संशय उपस्थित करून, आशुतोषचा अपमान करतो. यावेळी मात्र ऐकून शांत न राहता अरुंधती आशुतोषचा अपमान करणाऱ्या अभिषेकच्या कानाखाली लगावते.


अरुंधतीने का सोडलं देशमुखांचं घर?


गाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका बनली आहे. एका गाण्याच्या निमित्ताने आशुतोषसोबत बाहेर गेलेली अरुंधती रस्त्यातील अपघातामुळे त्याच गावातील एका घरात थांबण्याचा निर्णय घेते. यानंतर जेव्हा ती घरी परत येते, तेव्हा तिचा नवा अवतार पाहून अनिरुद्ध आणि देशमुखांच्या घरातील काही लोकांचा पारा चढतो. थेट आपल्या चारित्र्यावर संशय घेतल्याने अरुंधतीने देशमुखांचे घर सोडण्याचा निर्णय घेते.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha