यासंदर्भात कोल्हापूरमध्ये रात्री 12 वाजता सुरु झालेली बैठक पहाटे पाच वाजेपर्यंत चालली. या बैठकीत स्वबळाचा नारा देण्याबाबत निर्णय झाला.
महाआघाडीने स्वाभिमानीला हातकणंगले या एकाच जागेची ऑफर दिली होती. परंतु राजू शेट्टी तीन जागांच्या मागणीवर ठाम आहेत. यामध्ये वर्धा आणि बुलडाण्याच्या जागेचा समावेश आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकूण नऊ ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामध्ये हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर या जागांचा समावेश आहे.