शिवसेनेच्या योग्य त्या मागण्या भाजपनं मान्य करुन महायुतीची सत्ता लवकरात लवकर स्थापन करावी आणि सत्तेत रिपाइला वाटा मिळावा. शकतात. अरविंद सावंताना केंद्रात दुसर चांगलं खातं बदलून मिळण्याची देखील शक्यता आहे. दिवाळीतली भाऊबीज शिवसेना-भाजप या दोघांनी एकमेकांना ओवाळून साजरी करावी. या भाऊबीजेला मोठ्या भावाला लहान भावाला ओवाळवं लागेल असं दिसत आहे.
महाराजांचा निर्णय चुकला
मी उदयनराजेंना लोकसभेच्या निवडणूकीवेळीच रिपाइतं येऊन निवडणूकीत उतरा असं सांगितलं होतं पण, राजेंनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवलेली लोकांना आवडलं नाही. साता-यात अचानक पाऊस आला त्यात शरद पवार भिजले आणि मतांच्या पावसात श्रीनिवास पाटील भिजले.