मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच लढणार आहेत. तर ईशान्य मुंबईची जागाही भाजपच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. जालन्याची जागा रावसाहेब दानवेच लढवणार असल्याने आता अर्जुन खोतकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष झालं आहे. तर शिवसेनेचा विरोध पाहता ईशान्य मुंबईत कोण उमेदवार द्यायचा असा प्रश्न भाजपसमोर आहे.


त्यामुळे आता अर्जुन खोतकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. मात्र त्याचवेळी ईशान्य मुंबई मतदारसंघाचा प्रश्नही कायम आहे. कारण किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईची जागा कोण लढणार अशा प्रश्न सध्या दोन्ही पक्षांसमोर आहे.

जालन्यातून मला निवडणूक लढू द्या, अर्जुन खोतकरांचा रावसाहेब दानवेंकडे आग्रह

अर्जुन खोतकरांची भूमिका काय?
गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर यांनी बंड करत जालनाच्या जागेवर दावा केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांचा शब्द अंतिम राहिल असं वक्तव्य खोतकरांनी सांगितलं होतं. मात्र आता दानवेंना उमेदवारी मिळणार असल्याने अर्जुन खोतकर यांची वैयक्तिक भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ठाकरे घराण्याशी गद्दारी करणार नाही, अर्जुन खोतकरांच स्पष्टीकरण

भाजपचा उमेदवार कोण?
दुसरीकडे ईशान्य मुंबईतही भाजप लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण इथे किरीट सोमय्यांविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे भाजपचा ईशान्य मुंबईचा उमेदवार कोण या प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

जालन्याच्या तिढ्यावर उतारा
जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी युतीमधला नेत्यांनी चांगलीच शक्कल लढवली. मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकपदी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांची नेमणूक केली. नव्या जबाबदरीमुळे अर्जुन खोतकर यांची गोची होण्याची शक्यता आहे. तर पक्ष श्रेष्ठींकडून सुंठीवाचून खोकला घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दुसरीकडे अर्जुन खोतकर समर्थकांनी रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवण्यासाठी दबाव वाढवला आहे.

संबंधित बातम्या

जालन्याच्या जागेबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, अर्जुन खोतकरांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांच्या वतीने सहकारमंत्र्यांकडून दानवे-खोतकरांची कट्टी सोडवण्याचा प्रयत्न, जालन्यात दिलजमाई बैठक