मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीने जवळपास सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला आहे. औरंगाबादमधून इम्तियाज जलिल विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीच्या सहा उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या निकालातून स्पष्ट झालं आहे.

नांदेडमध्ये अशोक चव्हाण (काँग्रेस), सांगलीमध्ये विशाल पाटील (स्वाभिमानी), बुलडाण्यात राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी), हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी (स्वाभिमानी), परभणीत राजेश विटेकर (राष्ट्रवादी), यवतमाळ माणिकराव ठाकरे (काँग्रस) या उमेदवारांना वंचित आघाडीच्या उमेदवारींना धक्का दिला आहे.

Loksabha Result | लोकसभेच्या निकालाबद्दल प्रकाश आंबेडकर आणि सुधीर मुनगंटीवार यांचं मत

वंचित बहुजन आघाडीचा फटका

नांदेड

प्रताप चिखलीकर पाटील (भाजप) - 4,08,977 मते, अशोक चव्हाण (काँग्रेस) - 3,67,694 यशपाल भिंगे (वंचित आघाडी) - 1,44,586 मताधिक्य - 41,483

सांगली

संजयकाका पाटील (भाजप) - 3,49,621 विशाल पाटील (स्वाभिमानी) - 2,38,395 गोपीचंद पडळकर (वंचित आघाडी) - 1,86,752 मताधिक्य - 1,11,226

बुलडाणा

प्रताप जाधव (शिवसेना) - 3,65,158 राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) - 2,72,082 बळीराम शिरसकर (वंचित आघाडी) - 1,19,236 मताधिक्य - 93,076

हातकणंगले

धैर्यशील माने (शिवसेना) - 4,88,856 राजू शेट्टी (स्वाभिमानी) 3,94,146 अस्लम सय्यद - 99,546 मताधिक्य- 94,710

परभणी

संजय जाधव (शिवसेना)- 3,90,001 राजेश विटेकर (राष्ट्रवादी)- 3,73,492 आलमगीर खान- 1,11,561 मताधिक्य- 1,11,561

यवतमाळ

भावना गवळी - 3,25,251 माणिकराव ठाकरे (काँग्रेस) - 2,69,७४७747 प्रवीण पवार - 64,776 मताधिक्य- 55,504