ट्रेंडिंग
बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; खुद्द अजित पवारच उतरले रिंगणात
साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचाच दणका, पॅनलचे सर्वच उमदेवार आघाडीवर, लवकरच गुलाल उधळणार
Ankita Lokhande : क्लासीलूकमध्ये अंकिता लोखंडेच्या हटके अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
पाकिस्तानच्या बॉर्डरवरील हालचाली अचानक वाढल्या, सैनिकांची मोठी जमवाजमव, भारतीय सैन्याचा महत्त्वाचा निर्णय
Local Body Election | आजचा दिवस आनंदाचा, न्यायालयाच्या निर्णयावर Chhagan Bhujbal यांची प्रतिक्रिया
Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांत घ्या, कोर्टाचा महत्वाचा आदेश
कॅप्टनने माघार घेतलीय, मग पोरं काय खेळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तिसऱ्या टप्पातील मतदान झाले असून यात माढा आणि बारामती हादरुन गेले आहे. आता मावळला धक्का देण्याची वेळ आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Continues below advertisement
नवी मुंबई : देशातील विरोधकांची अवस्था वाईट झाली आहे. शरद पवार यांनी प्रथम निवडणूक लढवणार असे सांगितले आणि नंतर माघार घेतली. कॅप्टनने माघार घेतली मग त्यांनी उतरवलेली पोरं काय खेळणार, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली. पवार कुटुंबीयांनी मावळ मतदारसंघात बारामतीवरुन पाठवलेले पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल येथील प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत पार्थ पवार हे बारामतीचे पार्सल असून त्यांना परत बारामतीला पाठवा असे पवार यांचे नाव न घेता टीका केली. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून यात माढा आणि बारामती हादरुन गेले आहे. आता मावळला धक्का देण्याची वेळ आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यापलीकडे आघाडी सरकारने काहीही केले नाही. भाजप सरकारने उरी येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला. अतिरेक्यांचे तळ सैन्याने उद्ध्वस्त केल्याचे जगाने मान्य केले, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाखिचडीला हे मान्य नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
स्वत:च्या जाहीरनाम्यात काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतेय आम्ही 124 कलम काढून टाकू, देशविरोधी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात ठोस भूमिका घेणारे कलम काढून टाकण्यात यावे ही विरोधी पक्षाची मागणी आहे. अशा पक्षाला मतदान करणे योग्य आहे का, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Continues below advertisement