मुंबई : शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन डोस पूर्ण करण्यात येतील तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यावेळी शाळा सुरू होतील त्यावेळी शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झाल्यामुळे पालक देखील निश्चित होतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान दोन डोस पूर्ण झाले असतील तर आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र, केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरमान्य मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत सरकारकडून  कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री घटनास्थळी पोहचले आहेत.


अतिवृष्टी झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना : पवार
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवाय जमिनी खरवडून निघाल्या आहेत तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI