Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यात व्यवसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करत दरोडा टाकून जिवे मारण्याच्या धमक्या (Jalgaon Crime News) दिल्याप्रकरणी जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते विनोद देशमुख (Vinod Deshmukh) यांना अटक (Crime News) करण्यात आली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल गुन्ह्यात त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांनंतर ही अटक झाली असून, देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
“अजित पवार यांचे निकटवर्तीय, म्हणून पोलीस अटक करत नाहीत,” - मनोज वाणी (Manoj Vani on Ajit Pawar)
दरम्यान या प्रकरणात व्यावसायिक तथा फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन, “अजित पवार यांच्या दबावामुळे पोलीस अटक करत नाहीत,” असा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर अवघ्या काही दिवसांतच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने, त्यांच्या अटकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.मात्र या प्रकरणी पुढे आता नेमकी काय कारवाई होते, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
डॉक्टर व्हायचे नसल्याने 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत केली आत्महत्या (19-Year-Old Student Commits Suicide)
एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला निघण्याच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथील एका विद्यार्थ्याने गळफास घेत घरीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनुराग अनिल बोरकर असं मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. नीट परीक्षेत यश मिळविल्यानंतर डॉक्टर व्हायचे नसल्याने या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती सिंदेवाही पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. अनुरागने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मधून ही माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी जाण्यापूर्वी त्याने आपले जीवन संपविले.
मृतक अनुराग बोरकर याने नीट यूजी 2025 परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून 1475वी रँक पटकाविली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. मात्र त्याच्या आत्महत्येने हे स्वप्न अपूर्णच राहिले. त्याला काल सकाळी एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जायचे होते. परंतू राहते घरीच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे.