रत्नागिरी : आंबा घाटातील सड्याचा कडा या ठिकाणी दोन अनोळखी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही मृतदेह पुरुषाचे आहेत. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 17 ऑगस्ट रोजी हा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून लवकरच या दोघांचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला? यात घातपाताचा काही प्रकार आहे का? हे समोर येईल.


नेमकं काय घडलं? 


प्राप्त माहितीनुसार आंबा घाटातील सड्याचा कडा या ठिकाणी दोन अनोळखी मृतदेह आढळले. दाट झाडीमध्ये हे मृतदेह आढळले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही मृतदेह पुरुषांचे असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना समजताच  देवरुख व शाहूवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लगेच चालू केला. पोलिसांना सह्याद्री चांदोली व्याघ्र प्रकल्प परिसरात एक दुचाकी आढळली आहे. या दुचाकीचा आणि दोन मृतदेहांचा काही संबंध आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच या मृतदेहामागचं सत्य बाहेर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. 


मृतदेह बाहेर काढताना अडचणी


खोल दरीत हे मृतदेह पडल्यामुळे पोलिसांना ते बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी लागली. या मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांची उत्तरीय चाचणी केली जाईल. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  


हेही वाचा :


स्लॅब कोसळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; आईने फोडला टाहो; माजी नगरसेवकाला दिलाय दोष


Pune Crime News : पुण्यात मध्यरात्री भरचौकात गुंडाचा खून, पाठलाग करून टोळक्यानं दगडाने ठेचलं


ओठ, कान, नाकावर जखमा, बलात्कार करून हत्या, कोलकात्यातील डॉक्टरच्या पोस्टमॉर्टमनंतर धक्कादायक बाबी समोर!