income tax cut: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. या संपूर्ण अर्थसंकल्पात सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे आयकर मर्यादा वाढवून 12 लाखांपेक्षा जास्त करण्यात आली. आता या निर्णयाबाबत अर्थमंत्री सीतारामन (nirmala sitharaman) प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे आयकर कपातीच्या बाजूने होते, त्यांना आयकर कपात सुरुवातीपासूनच हवी होती. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नोकरशहांना पटवून देण्यात आम्हाला सर्वाधिक वेळ लागला.

Continues below advertisement


एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या बाबतीत सुरुवातीपासूनच स्पष्ट होते की, आपण कर कमी करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. पंतप्रधानांनंतर, या संपूर्ण प्रकरणावर उत्स्फूर्तपणे योजना तयार करणे आणि प्रस्तावाच्या रूपात पुढे ठेवणे हे आमच्या मंत्रालयावर अवलंबून होते. पंतप्रधानांच्या पाठिंब्यानंतर, आमच्यासमोर मंडळाला पटवून देण्याचे आव्हान होते आणि शेवटी आम्ही आमचा मुद्दा त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो. पंतप्रधान मोदी दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि सर्वसामान्यांचे ऐकतात आणि त्यांच्या गरजाही समजून घेतात. केंद्र सरकार सर्वांसाठी ते काम करते आणि त्यांचे प्रश्न सोडवते. अशा सरकारचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे, असंही निर्मला सीतारामन यांनी पुढे म्हटलं आहे.


याआधी, केंद्र सरकारने शनिवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये ऐतिहासिक निर्णय घेतला. या नवीन नियमानुसार 12 लाख रुपयांपर्यंत कोणताही आयकर भरावा लागणार नाही. पीएम मोदींनीही या निर्णयाबद्दल नंतर सांगितले की, हा नियम 1.4 अब्ज भारतीयांच्या आकांक्षाना बळ देतो. सहसा जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जातो, तेव्हा त्याचा उद्देश सरकारी तिजोरी भरण्याचा असतो. पण सर्वसामान्यांच्या खिशात पैसा कसा राहील आणि त्यांची बचत कशी वाढेल, हा या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स 


0 लाख ते 4 लाख - टॅक्स फ्री
4 लाख ते 8 लाख - 5 टक्के
8 लाख ते 12 लाख - 10 टक्के
12 लाख ते 16 लाख - 15 टक्के
16 लाख ते 20 लाख - 20 टक्के
20 लाख ते 24 लाख - 25 टक्के
24 लाखापुढे - 30 टक्के