Vidur Niti : आचार्य चाणक्यांप्रमाणेच (Chanakya Niti) महात्मा विदुर (Vidur) देखील अत्यंत बुद्धिमान आणि धोरणांचे जाणकार होते. त्यांची धोरणे आजही तितकीच समर्पक आहेत, जितकी महाभारत काळात होती. महाराजा धृतराष्ट्राचा धाकटा भाऊ विदुर हे महाभारतातील सर्वात महत्त्वाचे पात्र होते. महाराज धृतराष्ट्र यांच्यासोबत पैसा, घराणेशाही, राजकारण अशा सर्व बाबींवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांचे हे विचार त्या काळात आणि सध्याच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. याला विदुर नीती म्हणतात. महात्मा विदुरच्या मते, काही लोकांना पैसे देणे म्हणजे ते पैसे गमावणे आहे, कारण हे लोक कधीही कर्ज परत करत नाहीत. 



'या' लोकांना चुकूनही कर्ज देऊ नका 



ज्यांच्यावर विश्वास नाही : विदुर नीतिनुसार, ज्यांच्यावर तुमचा विश्वास नाही अशा लोकांना कधीही पैसे देऊ नका. अशा लोकांना दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे त्या व्यक्तीची नीट तपासणी करूनच त्यांना कर्ज द्या. 


आळशी लोक : महात्मा विदुर म्हणतात, आळशी माणसालाही पैसे उधार देऊ नका. हे लोक पैशाची किंमत समजत नाहीत आणि ते परत करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते नेहमी धूर्तपणे इतरांना लुटण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांकडून कर्ज दिलेले पैसे परत मिळावेत अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. 



प्रभावशाली लोक : खूप प्रभावशाली लोकांना पैसे देणे टाळा. जर त्यांचा हेतू बदलला तर तुम्ही तुमचे पैसे त्यांच्याकडून परत मिळवू शकणार नाही. 


अनैतिक कृत्ये करणारी लोकं : चुकीची कामे करणाऱ्या किंवा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना चुकूनही पैसे देऊ नका. हे लोक तुमच्या पैशांचा गैरवापर देखील करतील आणि ते परत देताना मागेही पडतील. त्यांचा अनैतिक कृत्यांशी संबंध असल्याने त्यांच्याकडून शत्रुत्व घेणेही योग्य नाही. 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या