Tuesday Astrology : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या आयुष्यात कधीही अशी वेळ येऊ नये ज्यामध्ये त्याला कर्ज घ्यावे लागेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही वेळेस आयुष्यात असे चढ-उतार येतात. ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो.


 


कर्जमुक्तीसाठी 'हे' काम अवश्य करा.
कधी कधी इच्छा नसतानाही कर्ज घ्यावे लागते तेव्हा अशी समस्या उद्भवते. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वाईट काळात कर्ज घेण्यात काहीच गैर नाही. कर्जाची परतफेड वेळेवर झाली तर कर्ज घेण्याच्या समस्येतून सुटका होते. पण जर हे कर्ज एक ओझे बनू लागले तर व्यक्ती आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अडचणीत येते.


 



ज्योतिषशास्त्रात कर्जमुक्तीचे अनेक मार्ग 
कर्जमुक्तीचे अनेक मार्ग ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत, त्यापैकी एक म्हणजे कर्जमुक्तीसाठी मंगल स्तोत्राचे पठण. या स्तोत्राचे पठण केल्याने भगवान हनुमानजी तुमच्या सर्व समस्या दूर करतात. तुम्ही याचे रोज पठण करू शकता. पण रोज शक्य नसेल तर मंगळवार आणि शनिवारी जरूर पाठ करा. हनुमानाचे ध्यान करताना या स्तोत्राचे पठण केल्याने कर्जाचे ओझे हळूहळू कमी होऊ लागते.


 


ऋण मोचन मंगल स्तोत्र


मङ्गलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदः।
स्थिरासनो महाकयः सर्वकर्मविरोधकः।।
लोहितो लोहिताक्षश्च सामगानां कृपाकरः।
धरात्मजः कुजो भौमो भूतिदो भूमिनन्दनः।।
अङ्गारको यमश्चैव सर्वरोगापहारकः।
व्रुष्टेः कर्ताऽपहर्ता च सर्वकामफलप्रदः।।
एतानि कुजनामनि नित्यं यः श्रद्धया पठेत्।
ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रमवाप्नुयात्।।
धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्।
कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्।।
स्तोत्रमङ्गारकस्यैतत्पठनीयं सदा नृभिः।
न तेषां भौमजा पीडा स्वल्पाऽपि भवति क्वचित्।।
अङ्गारक महाभाग भगवन्भक्तवत्सल।
त्वां नमामि ममाशेषमृणमाशु विनाशय।।
ऋणरोगादिदारिद्रयं ये चान्ये ह्यपमृत्यवः।
भयक्लेशमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा।।
अतिवक्त्र दुरारार्ध्य भोगमुक्त जितात्मनः।
तुष्टो ददासि साम्राज्यं रुश्टो हरसि तत्ख्शणात्।।
विरिंचिशक्रविष्णूनां मनुष्याणां तु का कथा।।
तेन त्वं सर्वसत्त्वेन ग्रहराजो महाबलः।।
पुत्रान्देहि धनं देहि त्वामस्मि शरणं गतः।
ऋणदारिद्रयदुःखेन शत्रूणां च भयात्ततः।।
एभिर्द्वादशभिः श्लोकैर्यः स्तौति च धरासुतम्।
महतिं श्रियमाप्नोति ह्यपरो धनदो युवा।।
।। इति श्री ऋणमोचक मङ्गलस्तोत्रम् सम्पूर्णम्।।


 


अमरत्वाचे वरदान
आज हनुमानजींचा दिवस आहे. रामायणानुसार असे मानले जाते की बजरंगबली हे पृथ्वीवरील सात ऋषींपैकी एक आहेत ज्यांना अमरत्वाचे वरदान मिळाले आहे. त्यांचा अवतार पुरुषोत्तम रामाला मदत करणारा होता. त्यांच्या शौर्याच्या अगणित कथा आहेत. वायू तसेच पवनदेव यांनी बजरंगबलीच्या संगोपनात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना पवनपुत्र असेही म्हणतात. जेव्हा जेव्हा त्यांची पूजा केली जाते तेव्हा हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि संकटमोचन अष्टक पठण करणे फार महत्वाचे मानले जाते. संकटमोचन हनुमान अष्टकाचे नियमित पठण केल्यास भाविकांना त्यांच्या गंभीर समस्यांपासून मुक्ती मिळते, असे सांगितले जाते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Pitru Paksha 2023: पितृ पक्षात मुलगी पिंडदानही करू शकते का? पुराणानुसार काय म्हटलंय?