Shiv Jayanti 2025 Astrology: आज 19 फेब्रुवारी.. आज शिवजयंती आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असल्याने महाराष्ट्रासह ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. भारताच्या पवित्र मातीत अनेक योद्धे आणि शूर व्यक्तींनी जन्म घेतला आहे. भारताच्या या सुपुत्रांच्या शौर्यगाथा आजही मातृभूमीच्या मातीत अजरामर आहेत. भारतातील शूर राजे आणि योद्ध्यांची गणना केली जाते, तेव्हा त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव नक्कीच घेतले जाते. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे जनक त्यांना म्हटले जाते. शिवाजी महाराजांना हिंदुहृदयसम्राट म्हणूनही ओळखतात, तर काही लोक त्यांना मराठ्यांची शान मानतात. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला. शिवाजी महाराज हे केवळ एक महान शासक नव्हते, तर त्यांची प्रतिमा एक दयाळू राजा देखील होती. आजही लोक त्यांची स्तुती करताना थकत नाहीत, हे जाणून घेण्यासाठी वाचा शिवाजी महाराजांच्या जन्मकुंडलीशी संबंधित काही रंजक गोष्टी....


छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकुंडली काय सांगते?


ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये त्याच्याबद्दल अनेक रहस्ये उघड करण्याची शक्ती असते, ज्याबद्दल आपल्याला अनेकदा माहीत नसते. अशावेळी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या जन्मकुंडलीचे असे विश्लेषण घेऊन आलो आहोत, जे जाणून घेतल्यावर तुम्हालाही खात्री होईल की, शिवाजी महाराजांच्या जन्मकुंडलीतच त्यांच्या महानतेचे रहस्य दडले असावे...


नाव : छत्रपती शिवाजी
जन्मतारीख: फेब्रुवारी 19, 1630
जन्म वेळ: 18:26:0
जन्म ठिकाण: शिवनेरी, जुन्नर, पुणे




ज्योतिषशास्त्रानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची सिंह ही लग्न राशी असल्याने ते एक कार्यक्षम, सत्यनिष्ठ आणि निष्ठावंत राज्यकर्ते होते हे स्पष्ट होते.


शिवाजी महाराजांच्या कुंडलीतील सातव्या घरात सूर्याचे स्थान हे देखील स्पष्टपणे सूचित करते की, एक उत्कृष्ट शासक असण्याबरोबरच ते एक आकर्षक नेते आणि एक भव्य व्यक्तिमत्व देखील होते.


शिवाजी महाराजांच्या कुंडलीत, चंद्र दहाव्या घराच्या उच्च राशीमध्ये उपस्थित आहे आणि हे सूचित करते की शिवाजी महाराजांना त्यांच्या आईकडून अनेक गुण मिळाले होते, हे देखील सूचित करते की शिवाजी महाराज खूप बलवान होते आणि त्यांच्याकडे मजबूत अंतर्दृष्टी होती, ज्यामुळे त्यांना एक दूरदर्शी शासक म्हणून खूप प्रशंसा मिळाली.


शिवाजी महाराजांच्या कुंडलीत सहाव्या घराचा स्वामी शनीची उपस्थिती, त्याच्या उच्च चिन्हात दर्शवते की शिवाजी महाराजांनी स्वतःला कोणत्याही कामात पूर्णपणे समर्पित केले आणि ते पूर्ण केलेच. याशिवाय निर्भय, धाडसी आणि लोकनेते अशी भक्कम प्रतिमा निर्माण करण्यातही ते यशस्वी ठरले.


5 ग्रह वायु तत्व राशीत आहेत (मिथुनमध्ये मंगळ, तूळ राशीमध्ये बुध-गुरू आणि सूर्य कुंभ राशीमध्ये) हे सूचित करते की ते एक शासक देखील होते, जे नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत असे.


याशिवाय, शिवरायांच्या कुंडलीतील आठव्या भावात उच्चस्थानी शुक्राची उपस्थिती दर्शवते की त्यांची ग्रहण क्षमता खूप चांगली होती आणि त्यांची बोलण्याची शैली देखील अशी होती की, ते लोकांना सहजपणे आपले अनुयायी बनवू शकत होते.


कुंडलीत मंगळ आणि शनि या दोन्ही ग्रहांची उपस्थिती माणसाला खूप शक्तिशाली आणि बलवान बनवते आणि हे शिवरायांच्या जीवनावरून सिद्ध होते.


शिवाजी महाराजांशी संबंधित इतर काही गोष्टी:


धर्मनिरपेक्ष शासक -  छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजी आणि जिजाबाई यांचे पुत्र होते. पुण्याजवळील शिवनेरी किल्ला या ठिकाणी शिवाजीचा जन्म झाला. शिवाजी महाराजांची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते होते आणि त्यांनी सर्व धर्मांचा समान आदर केला. जबरदस्तीने केलेले धर्मांतर त्यांना अजिबात आवडत नव्हते. त्याच्या सैन्यातील महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम सैनिकही तैनात होते.


एक कुशल लष्करी रणनीतीकार - शिवाजी महाराजांबद्दल असे म्हटले जाते की, इतर सर्व चांगल्या गुणांबरोबरच, त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते एक कुशल लष्करी रणनीतिकार होते. या विशेषतेच्या जोरावर त्यांनी आपल्या सैनिकांची संख्या वाढवली होती.


एक शूर योद्धा - आपण आपल्या शालेय जीवनापासून शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा ऐकत आहोत. शिवाजी महाराजांचे सैन्य, हे पहिले सैन्य होते ज्यात गनिमी युद्धाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला होता. एक मजबूत सैन्य तयार करणारे शिवाजी महाराज हे पहिला राजा होते.


सर्व धर्मांचा आदर - शिवाजी महाराजांना सर्वांपेक्षा वेगळे बनवले ते म्हणजे ते स्वतःच्या धर्माबरोबरच इतर सर्व धर्मांचाही समान आदर करायचे. संस्कृत आणि हिंदू राजकीय परंपरांचा विस्तार करणे हा त्यांचा उद्देश होता.


मुघलांचे शत्रू - 1657 पर्यंत शिवाजी महाराजांनी मुघलांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मार्च 1657 मध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाला, त्यामुळे दोघांमध्ये अशा अनेक लढाया झाल्या, ज्याचा कोणताही तोडगा निघाला नाही.


हेही वाचा>>>


Shani Dev: शनीच्या अस्तामुळे 'या' राशींचा भाग्योदय खरंच थांबणार का? कोणत्या राशींना होणार नुकसान? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )