Astrology :  प्रत्येक राशीवर ग्रहांचा प्रभाव असतो. ग्रहांच्या स्थितीमुळे माणसाचा स्वभाव बदलत राहतो. जेव्हा राशींवर शुभ ग्रहांची दृष्टी असते तेव्हा व्यक्तीला कामात यश मिळते. त्याच्या स्वभावाचा इतरांवर प्रभाव पडतो. परंतु जेव्हा राशीवर अशुभ ग्रहांची दृष्टी असते तेव्हा व्यक्तीच्या स्वभावात नकारात्मकता दिसून येते. ज्यात तो अशा चुका करतो की, त्यामुळे त्याला त्रास सहन करावा लागतो. हीच गोष्ट मुलींच्या बाबतीतही लागू होते.


वृषभ : या राशीच्या मुली खूप साहसी आणि उत्साही असतात. परंतु, त्यांना खूप लवकर राग येतो. त्यांना लहानसहान गोष्टीचेही वाईट वाटते. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर ताबा राहत नाही आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप वाईट बोलतात. त्यांना शांत करणे खूप कठीण होते. ज्या मुलींचे नाव ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो ने सुरू होते त्यांच्या राशी वृषभ असते. 


सिंह : या राशीच्या मुलींना खूप लवकर राग येतो. तेवढ्यात त्या भावनिक देखील असतात. त्यांना छोट्याशा गोष्टीचे वाईट वाटते. रागाच्या भरात ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीसोबतचे नातेही तोडू शकतात. ज्या मुलींचे नाव म, मी, मू, मी, मो, ता, ती, तू, या अक्षरांनी सुरू होते त्यांची राशी सिंह आहे.


मकर : या राशीच्या मुली सुद्धा खूप रागीट असतात. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते. त्यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवणे हे त्यांना आवडत नाही. समोरच्या व्यक्तीने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर त्यांना खूप राग येतो. रागाच्या भरात ती काहीही बोलते. ज्या मुलींचे नाव भो, जा, जी, खि, खु, खे, खो, गा, गी, या अक्षरांनी सुरू होते त्यांची रास  मकर असते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :