Raju Shetti :  स्वाभिमानी शेतकरी संघटना केंद्र आणि राज्य सरकारविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला. ऐतिहासीक अशा दसरा चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघनेचे कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटने प्रमुख राजू शेट्टी  (Raju Shetty)  यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जात आहे.
 
काय आहेत मागण्य?


राज्यातील महाविकास आघाडी सरकारही शेतकऱ्यांच्या हिताविरोधात काम करत आहे. त्याच्या निषेधार्थ विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. 
 
1) रत्नागिरी-सोलापूर रस्ता भुसंपादन बेकायदेशीर आहे. 
2) साखरेचे दर वाढल्याने उसाचा दुसरा हप्ता दोनशे रुपये द्यावा
3)खते आणि पशुखाद्य यांची दरवढ तत्काळ मागे घ्यावी
4)सक्तीचे वीज कनेक्शन तोडणे बंद करावे,
5)  भुमिग्रहण, अधिग्रहण कायदा पूर्वीप्रमाणे लागू करावा
6) कर्जाची नियमीत परकफेड करणाऱ्या सेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान मिळावे


दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आधीच वातावरण निर्मिती केली होती. जिल्ह्यात सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी दौरे करुन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्यामुळे या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थिती दर्शवली आहे. 


राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आता दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी राजू शेट्टी हे सक्रिय होते. इतकंच नाही तर ते महाविकास आघाडीचे सूचकही होते. मात्र, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि राजू शेट्टी यांच्यात बिनसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण, भूमी अधिग्रहण कायदा, ऊस दराचा मुद्दा, वीज वसुली आदी विषयांवरुन राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. आता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही, असा इशाराच शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: