अभिनेत्री रिचा चढ्ढा तिच्या एका ट्विटमुळे अडचणीत आली आहे.

गलवान व्हॅलीबद्दल केलेला विनोद तिला चांगलाच भोवला आहे.

रिच्याच्या ट्विटनंतर तिच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

रिचाने ट्विटमध्ये भारतीय लष्कराची खिल्ली उडवत असल्याचा आरोप होत आहे.

सरकारने परवानगी दिली तर भारतीय लष्कर पाकिस्तानकडून पीओके परत घेऊ शकते असे ट्विट उपेंद्र द्वेदी यांनी केले होते.

उपेंद्र यांच्या ट्विटवर रिचाने गलवान हाय म्हणतो असे लिहिले.

या ट्विटमुळे रिचा चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

सोशल मीडियावरून आता रिचाला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

रिचाने देशाची माफी मागावी अशी मागणी जोर धरून लागली आहे.

अखरे या संपूर्ण प्रकरणावर रिचाने माफी मागितली आहे.