आजच्या धावपळीच्या जीवनात, माणूस पैसे मिळवण्यासाठी संपूर्ण दिवस कष्टात घालवतो, परंतु तरीही त्याला अपेक्षित यश आणि आनंद मिळत नाही.



अशा वेळी तो यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट म्हणजेच सोप्या मार्गाचा अवलंब करतो, पण आपण ती चूक करू नये.



पद आणि पैसा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, पण मोठे ध्येय गाठायचे असेल तर कठोर परिश्रम करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची गरज असते.



एखादं मोठं काम करायचं असेल, तर आपण कोणत्या पदावर आहोत किंवा काम कसं करावं याकडे लक्ष देऊ नये.
ध्येय साध्य करण्यासाठी लहान राहूनही मोठे काम करता येते.


जे मेहनती, शिस्तप्रिय आणि समर्पित असतात त्यांच्यावरही देवी लक्ष्मी प्रसन्न असते.



यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही. आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे.



तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल.



यशाच्या पायऱ्या या संधीच्या पायऱ्या चढूनच चढता येते. यशस्वी होण्यासाठी अयशस्वी व्हावे लागते.



परीक्षा आणि दुःखाच्या अनुभवातूनच आत्म्याला बळ मिळते, दृष्टी स्पष्ट होते, महत्त्वाकांक्षा प्रेरित होते आणि यश प्राप्त होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.