श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.
यावर्षी भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे.
या पवित्र दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते.
तुम्हाला माहीत आहे का, राखी बांधताना हातात नारळ धरणे का आवश्यक आहे?
असे मानले जाते की भावाने बहिणीकडून रिकाम्या हाताने राखी बांधून घेऊ नये.
राखी बांधताना भावाचा हात हिरवागार असायला हवा.
जर या व्यक्तीचे हात हिरवेगार असतील तर, भावाच्या हातात नेहमी लक्ष्मी मातेचा वास असतो.
म्हणून आजही या परंपरेचे पालन करत हातात नारळ ठेवला जातो.
नारळ उपलब्ध नसल्यास, मिठाई किंवा फळ हातात ठेवू शकता.
पण रिकाम्या हाताने भावाला बहिणीकडून राखी बांधून घ्यायची नाही. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.