जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील पाचक रस (Digestive juices) पातळ होतात. यामुळे अन्न पचनाची प्रक्रिया मंदावते आणि अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्यास अडथळा येतो.
अन्न पचनासाठी पोटात विशिष्ट प्रमाणात ऍसिड तयार होते. पाणी प्यायल्याने हे ऍसिड सौम्य होते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि ऍसिडिटी, गॅस आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.
पाणी प्यायल्याने अन्न लवकर आतड्यांमध्ये सरकते, ज्यामुळे पोषक तत्वांना शोषण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
काही अभ्यासांनुसार, जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढू शकते.
अन्न व्यवस्थित न पचल्याने चरबी जमा होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटात जड आणि भरल्यासारखे वाटू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.