अरे बाळा,
उदास असशील तर माझे नाव घे,
दु:खी असशील तर माझे ध्यान घे,
मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे,
एवाढ्याने समाधानी नसशील तर बाळ... अक्कलकोटची वाट घे



वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पणज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरु नका.



तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नेस, तर डोळे बंद करुन माझे ध्यान कर, अशाने तु माझ्याशी संवाद साधशील



बाळा, मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो... फक्त एकदास हाक मार



लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही,कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही



कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल,तर मा सांग
माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे,
त्यापर्यंत नक्की पोहचेल



विवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घेतला असशील तर,
मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण



जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा
कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल



तुला जर वाटत असेल की, कशाला स्वामींना उगाच त्रास द्याचा आपले दु:ख सांगून? तर खरा त्रास तू आता देत आहेस, काहीच न सांगून



अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल