India Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एट सामन्यात भारताचं बांगलादेशला 117 धावांचं आव्हान
जयदीप मेढे
Updated at:
22 Jun 2024 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndia Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एट सामन्यात भारताचं बांगलादेशला 117 धावांचं आव्हान
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या सुपर एट साखळी सामन्यात भारतानं बांगलादेशला विजयासाठी १९७ धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. हार्दिक पंड्यानं अवघ्या २७ चेंडूंत नाबाद ५० धावांची धडाकेबाज खेळी उभारली. त्याच्या अर्धशतकाला चार चौकार आणि तीन षटकारांचा साज होता. कर्णधार रोहित शर्मानं २३, विराट कोहलीनं ३७, रिषभ पंतनं ३६ आणि शिवम दुबेनं ३४ धावांची खेळी केली. त्यामुळंच भारताला २० षटकांत पाच बाद १९६ धावांची मजल मारता आली. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं षटकांत बाद धावांची मजल मारली आहे.