India Won T20 World Cup : एका कॅचने फिरवली मॅच..17 वर्षांनी भारत विश्वविजेता! ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारबाडोस : टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup) च्या फायनलच्या मॅचकडे कोट्यवधी भारतीयांच्या नजरा लागलेल्या असताना शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला (South Africa) विजयासाठी 16 धावांची गरज होती. रोहित शर्मानं (Rohit Sharma) बॉल हार्दिक पांड्याच्या हातात दिला होता. स्ट्राईकवर आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर (David Miller) होता. डेव्हिड मिलरनं पहिलाच बॉल सीमारेषेबाहेर मारण्याचा प्रयत्न केला. बाऊंड्रीवर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) होता. सूर्यकुमार यादवनं धावत येत कॅच पकडला. सीमारेषेच्या आता जाणार इतक्यात सूर्यकुमार यादवनं बॉल हवेत टाकला पुन्हा बाहेर पळत येत कॅच पकडला. इथं मॅच खऱ्या अर्थानं भारताच्या बाजूनं फिरली. भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. भारतानं या विजयासह टी 20 वर्ल्ड कप जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 17 वर्षानंतर भारतानं पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. तर, 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.