भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी : 53 धावांची आघाडी किती मोलाची? अॅडलेडहून गौरव जोशीचा रिपोर्ट
IND VS AUS: अॅडलेड येथे खेळवल्या जाणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियातील डे-नाईट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व निर्माण केलं. भारतीय गोलंदाजांच्या पध्दतशीर माऱ्यामुळं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ 191 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 53 धावांची आघाडी मिळाली आहे.