ICC T20 WC 2021 : कशी असेल टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्ध रणनीती? किती गोलंदाज खेळवणार?

टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून हार स्वीकारावी लागली आणि मग सुरु झाली ती हार्दिक पंड्याचं काय करायचं, या विषयाची चर्चा. त्या चर्चेची गाडी आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याला खेळवायचं की शार्दूल ठाकूरला इथवर आली आहे. पण भारतीय संघात खरंच तेवढाच बदल अपेक्षित आहे का? न्यूझीलंडविरुद्धच्या रविवारच्या सामन्यात दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाज खेळवायचे की, तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज? पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा थेट दुबईतून रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola