विराटनंतर रो'हिट' कर्णधार होणार? Virat Kohli नंतर Rohit Sharma कडे संघाची धुरा?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2021 11:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपले कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. त्याच्या ठिकाणी रोहित शर्माची वर्णी लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. कसोटी संघाचे नेतृत्व मात्र विराटने आपल्याकडेच ठेवण्याचं ठरवलं असल्याचीही माहिती आहे. (Virat can leave limited over cricket captaincy after T20 World Cup).