Virat Kohli : एकदिवसीय कर्णधारपदानंतर विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदालाही रामराम

Virat Kohli steps down as India Test captain : टी20, एकदिवसीय कर्णधारपदानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदालाही रामराम ठोकला आहे. शनिवारी विराट कोहलीने सोशल मीडियावरुन कसोटी कर्णधारपद सोडल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामधील वाद सुरु होता. टी20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय असा वाद सुरु झाला होता.  विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 58.82 टक्के सामने जिंकले आहेत. विराटच्या नेतृत्वावात 68 पैकी 40 सामने जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केलाय. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola