IND VS ENG : टीम इंडियाचं इंग्लंडला विजयासाठी 169 धावाचं आव्हान

Continues below advertisement

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या उपांत्य सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारतानं २० षटकांत सहा बाद १६८ धावांची मजल मारली. इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर टीम इंडियाची बाराव्या षटकांत तीन बाद ७५ अशी कठीण अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत विराट कोहली आणि हार्दिक पंड्यानं केलेल्या ६१ धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला मजबुती दिली. विराट कोहलीनं ४० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ५० धावांची खेळी उभारली. हार्दिक पंड्यानंही वेगवान अर्धशतक झळकावलं. त्यानं ३३ चेंडूंत ६३ धावांची खेळी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram