भारतीय Under 19 संघाकडून युगांडाचा धुव्वा, भारताचा विश्वचषकातला सलग तिसरा विजय

राज बावा आणि अंगरिक्ष रघुवंशीच्या खणखणीत शतकांच्या जोरावर युवा भारतीय संघानं अंडर नाईन्टिन विश्वचषकात युगांडाचा तब्बल ३२६ धावांनी धुव्वा उडवला. भारताचा विश्वचषकातला हा सलग तिसरा विजय ठरला. राजच्या नाबाद १६२ आणि अंगरिक्षच्या १४४ धावांच्या खेळीमुळे भारतानं ५ बाद ४०५ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर कर्णधार निशांत सिंधूच्या प्रभावी माऱ्यासमोर युगांडाचा डाव ७९ धावांत आटोपला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola