चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपात तथ्य, अशोक चव्हाणांच्या आरोपांना यशोमती ठाकूर यांचा दुजोरा
परभणी : शिवसेनेसोबत जाण्याबाबत दिल्लीतील नेते नाराज होत, मात्र राज्यात भाजपकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. त्यामुळे मी स्वतः जाऊन त्यांना भाजपला सत्तापासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेलच हे पटवून दिल्याने आपण महाविकास आघाडीत सामील झाल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री यांच्याकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.