भारतीय जवानांना फिंगर तीनवर का आणलं,कैलास पर्वत चीनच्या ताब्यात का दिला? राहुल गांधींचा मोदींना सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली: भारत आणि चीन या दोन्ही देशांनी लडाखच्या सीमेवरुन आपापले सैन्य माघार घ्यायचे ठरवले आहे. आता या प्रश्नावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाच्या लष्कराला फसवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पंतप्रधानांनी चीनला भारतीय भूप्रदेश का दिला ते सांगावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनला घाबरले असून त्यांनी भारतीय लष्कराला धोका दिला असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच पंतप्रधानांनी चीनला भारतीय भूप्रदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.